प्रत्येक व्यक्तीला जेवण मिळत, कोणीच उपाशी राहणार नाही यासाठी संपूर्ण जगभरात हा जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर 2018 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेने ह्या दिनाला मान्यता दिली.
संयुक्त राष्ट्रसंघाने त्यांच्या दोन संस्था अन्न आणि कृषी संघटना (FAO) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) ला संपूर्ण जगभरातील अन्नसुरक्षेसाठी नियुक्त केले गेले. म्हणूनच 7 जून 2019 ला पहिल्यांदा जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.
जागतिक अन्न सुरक्षा दिन विशेष माहिती | World Food Safety Day [ Marathi]
अन्न सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी संयुक्त राष्ट्रांनी मार्गदर्शन केले आहे ते आपण खालील प्रमाणे पाहूया. सर्वात पहिले आपण अन्नसुरक्षा काय आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
अन्नसुरक्षा काय आहे ? | what is food safety
आपण रोज बरेच पदार्थाचे सेवन करतो, अन्नसुरक्षा हे सुनिश्चित करते की उत्पन्नापासून कापणी, प्रक्रिया, संग्रह आणि वितरण इत्यादी तयारी करणे गरजेचे असते आणि सुरक्षेसाठी सुद्धा चांगली असते. आणि ह्याच बद्दलची जागरुकता करण्याची गरज. म्हणून हे अन्नसुरक्षा ने ही माहिती प्रदान केली आहे.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या म्हणण्यानुसार दरवर्षी दहा पैकी एक व्यक्ती दूषित अन्न किंवा बॅक्टेरिया युक्त खाद्य पदार्थांमुळे आजारी पडतो. जगातील लोकसंख्येनुसार हा आकडा साठ कोटीच्या पुढे गेला आहे. आणि हे खूप वाईट गोष्ट आहे.
जागतिक विकसित आणि विकसनशील देशांमध्ये दरवर्षी अन्न आणि जलयुक्त आजारांमुळे अंदाजे 30 लाख लोकांचा मृत्यू होतो.
आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. वेगानं वाढणारी खाद्य साखरे आणि व्यवसाय स्पर्धा यांच्यामधील संरक्षण करण्यासाठी मानके आणि नियम अधिक महत्त्वाचे आहे.
सुरक्षित आणि पौष्टिक आहाराचा वापर करूनच जीवन निरोगी ठेवण्यासाठीच या दिनाचे खूप महत्त्व आहे आणि ह्याची जागृकता आपण केली पाहिजे.
भारताची अन्नसुरक्षा बद्दल थोडक्यात माहिती
सुरक्षित अन्न पुरविण्याच्या राज्यांनी केलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक (SFSI) विकसित केला आहे. FSSAI ने खाद्य कंपन्या आणि व्यक्तींचे योगदान ओळखून ‘ईट राइट अवॉर्ड’ सुरू केला आहे,ज्यामुळे नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यासाठी अन्न निवडी करण्यास सक्षम बनविले गेले.
अन्नसुरक्षा बद्दल संयुक्त राष्ट्राने काही महत्वाचे मुद्दे सांगितले आहे
- सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जेवण सुनिश्चित केले पाहिजे.
- कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने राबविण्याची गरज आहे.
- व्यावसायिकाने अन्न पदार्थ सुरक्षित असल्याची खात्री द्यावी.
- सर्व ग्राहकांना सुरक्षित, निरोगी आणि पौष्टिक आहार मिळविण्याचा हक्क आहे.
- अन्न सुरक्षा ही एक सामायिक जबाबदारी आहे. सुरक्षित, पौष्टिक आणि पुरेसे अन्न चांगल्या आरोग्यास प्रोत्साहित करतं. त्याचबरोबर उपासमारीची समस्या दूर करतं.
Note – जर तुम्हाला World Food Safety Day Marathi हि माहिती आवडली असेल तर तुम्ही Facebook, instagram आणि twitter वर शेअर करा.