को- जागर्ती’? म्हणजे ‘कोण जागं आहे ‘ ? अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला ‘कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima)’ असे म्हणतात. पौर्णिमा खरंतर मध्यरात्रीच येत असते पण ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असते तिला ” नवान्न ” म्हणजे बोली भाषेत नव्याची पौर्णिमा’ असे म्हणतात. कारण याच वेळेत नवी धान्य आलेली असतात. कोकणा मध्ये तर या दिवशी नव्या तांदळाची खीर करण्याची पद्धत आहे. ही खीर रात्री चंद्रप्रकाशात ठेवली जाते. चाद्रप्रकाशाचे गुण या खिरीत उतरतात व दमा, अस्थमा आशा व्याधी असणाऱ्यांनी ही खीर खाल्याने आराम पडतो असे मानले जाते.
याच दिवसात भात, नाचणी, वरी तसेच झेंडूची फुले व आंब्याची पाने वापरून केलेली माळ घराच्या प्रवेशद्वारावर मोठया उत्साहात लावली जाते. यातून येणाऱ्या नव्या धान्याने स्वागत केले जाते. तसेच या रात्री आटवलेले दूध एकत्रितपणे प्राशन करतात. काव्याशिवाय चांदणे नाही व चांदण्याशिवाय काव्याला तेज नाही हे खरं आहे. म्हणूनच तर ” चांदण्यात फिरताना माझा धरलास हात असे मुलायम रेशीम काव्य निर्माण होते. मग ” चांदणे शिंपित जाशी ” हे योगानेच येते . आशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला कवीही खूप फुलवत असतात.
कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती | Kojagiri Purnima Information in Marathi
कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते हा प्रश्न पडणे प्रत्येकानं पडतो आणि तो अगदी स्वाभाविक आहे. यासाठीच आज आपण जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमेचे महत्व आणि कोजागिरी पौर्णिमाची संपूर्ण माहिती.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडतात. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटलं जात. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिल आहे.
प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करता या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र असते. या 9 दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावी पूजा करण्यात येते. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. यालाच सीमोल्लंघन देखील म्हटलं जातं. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात. पावसाळा संपून नवी पिके हाताशी येतात. त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.
हे सुद्धा वाचा:- दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व
कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळेच महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावा आणि मग ते दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा आपल्याला होतो. थंडीचे दिवस सुद्धा या काळात सुरू होतात त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो. आणी यामुळे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.
कोजागिरी पोर्णिमा पूजेत आपण लक्ष्मीची पूजा का करतो?
पौराणिक मान्यतेनुसार, कोजागिरी पोर्णिमाच्या दिवशी समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी प्रकट झाली. त्यामुळे हा दिवस देवी देवतेचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. कोजागिरी पोर्णिमाच्या दिवशी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो आणि रात्री त्याचा प्रकाश अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे या दिवशी खीर तयार करून खुल्या आकाशाखाली ठेवली जाते. यासोबतच देवी लक्ष्मीला खीर अर्पण केल्याने ती खूप प्रसन्न होते आणि ती प्रत्येक संकटावर मात करून सुख-समृद्धी मिळवते.
कोजागिरी पोर्णिमा दिवाळीपेक्षाही विशेष मानली जाते. कारण या दिवशी देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते आणि रात्री कोण जागर करत आहे ते पाहते. अशा स्थितीत ती आनंदी होते आणि सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देऊन निघून जाते. त्यामुळे या दिवशी रात्री लक्ष्मीची पूजा करावी.
Note: जर तुमच्याकडे Kojagiri Purnima in marathi मध्ये अजून Information असेल, जर दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही कमेंट किंवा ईमेल मध्ये सांगू शकता. आम्ही ती माहिती अपडेट करू. तुम्हाला Kojagiri Purnima information in marathi चांगली वाटली असेल तर तुम्ही WhatsApp, Facebook आणि sharechat वर Share करू शकता.