nitin rathod
अरुची वाढणे, गॅसचा त्रास, करपट ढेकरा येणे, अपचन, भूक न लागणे, मलावरोध होणे यांवर सोपा उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात तेवढाच लिंबाचा रस घेऊन त्यात थोडे सैंधव घालून रोज सकाळी प्यावे.
आले व कांद्याचा रस एकत्र करून चमचाभर प्यायल्याने उलटी बंद होते.
आल्याचा व पुदिन्याचा काढा करून ताप आलेल्या व्यक्तीस दिल्याने धाम येतो व तापही उतरतो. थंडी वाजून ताप आल्यास या काढ्याचा वापर केला असता गुण येतो.
आलेपाकामध्ये वेलची, जायफळ व लवंग घालून हा पाक बरणीमध्ये भरून ठेवावा. दररोज थोडा थोडा पाक आहारात घेतला असता अग्नीमांद्य, अरुची, कफविकार, वायूविकार, आमवृद्धी यांवर फायदा होतो.
अंग थंड पडले असेल तर लसूण व आले एकत्र करून त्याचा रस काढून अंगाला चोळल्याने अंगात उष्णता येते.
आल्याचा रस गरम करून नंतर त्याचे कोमट थेंब कानात घातल्याने ठणका मारणे बंद होते.
लहान मुलांना दूध पचत नसेल तर दूध उकळवताना त्यात आले टाकून ते दूध दिले असता चांगले पचते.
आवाज बसला असता किंवा घसा दुखत असेल तेव्हा आले, लवंग व मीठ एकत्र करून खावे.
आल्याचा रस खडीसाखरे बरोबर घेतल्यास भोवळ येणे, चक्कर येणे बंद होते.