टीम इंडियाने इतिहास रचला, हे महान रेकॉर्ड तोडले आहे
Image Credit: icc cricket
मित्रांनो टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. या कसोटीतील दुसरा सामना अतिशय रोमांचक झाला.
Image Credit: icc cricket
टीम इंडियाने कॅरेबियन संघासमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Image Credit: icc cricket
कसोटीच्या चौथ्या दिवशी कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 44 चेंडूत 57 धावा केल्या. तर ईशान किशननेही आपल्या तुफानी फलंदाजीने शो चोरून नेला.
Image Credit: icc cricket
रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या सलामीच्या जोडीने खळबळ उडवून दिली. रोहित 44 चेंडूत 57 धावा करून बाद झाला. त्याचवेळी यशस्वीने शुभमन गिलच्या साथीने अवघ्या 12.2 ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला.
Image Credit: icc cricket
यासोबतच भारतीय संघाने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 रनाचा टप्पा पार करण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर केला आहे.
Image Credit: icc cricket
यासह टीम इंडियाने श्रीलंकेचा 22 वर्ष जुना विक्रम मोडला. टीम इंडियाने अवघ्या 74 चेंडूत 100 धावांचा टप्पा पार केला.
Image Credit: icc cricket
2001 मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळताना श्रीलंकेने 13.2 ओव्हरमध्ये म्हणजे 80 चेंडूत 100 धावांचा टप्पा गाठला होता
क्रिकेटशी संबंधित माहितीसाठी Dnyanshala.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.