उन्हाळ्यात जास्त करून लोक थंड पाणी पिण्यासाठी फ्रिजचा वापर करतात, पण आजच्या या युगात सुद्धा काही लोक मातीच्या माठातलं थंड पाणी पिण्यास पसंत करतात. पण आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की माठातल पाणी थंड का असत? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
मातीच्या माठात पाणी थंड का राहत? How does the water inside a clay pot get cold?
पाणी थंड होणं बाष्पीभवनच्या क्रियेवर अवलंबून असत.जेवढे जास्त वाष्पीभवन होत तेवढ पाणी थंड होत.धातूच्या भांड्यांच्या तुलनेत बाष्पीभवन प्रक्रिया मातीच्या भांड्यात लवकर होते. कारण मातीच्या भांड्यात लहान छिद्र असतात जे आपण डोळ्याने बघू शकत नाही.
माठात पाणी या छिद्रांमधून माठाच्या पृष्ठभागावर येत आणि बाहेरील उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रिया होते,या प्रक्रियेत माठाच्या आतील भागाचं तापमान कमी होत.बाष्पीभवनची ही प्रक्रिया उन्हाळ्यातच चांगल्या प्रकाराची होते. हेच कारण आहे की उन्हाळ्यात धातूच्या भांड्यांच्या तुलनेत मातीच्या माठात पाणी थंड राहतं.
Note – मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अश्याच ज्ञाना संबंधित माहितीसाठी आपल्या Facebook, instagram आणि sharechat जला नक्की फॉलो करा.